ताज्या बातम्या
बारामतीत शेतकरी, महिला बचत गट, युवक व विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरता अभियान. || घरपट्टी - पाणीपट्टी करवसुलीसाठी अश्विनी बनसोडे यांचा आदर्शवत पुढाकार. || राष्ट्रवादी काँग्रेसच्या क्रियाशील सभासद नोंदणी उपक्रमात अश्विनी बनसोडेंची आघाडी. || “राणाजी, यकीन... धोखा... मौका” प्रविण मानेंचे 'हे' व्हाट्सअप स्टेटस कुणासाठी?. || वृंदावन हॉटेलसमोरील पार्किंग वादातून जीवघेणा हल्ला ; मुख्य सूत्रधार तन्मेष साळुंखे अटकेत. || चेक बाऊन्सप्रकरणी तीन महिने साध्या तुरुंगवासाच्या शिक्षेसह दुप्पट रकमेची नुकसानभरपाई देण्याचा बारामती न्यायालयाचा निकाल. || १५ दिवसांत घरकुलाचे काम सुरू करा, अन्यथा मंजुरी रद्द! ; गटविकास अधिकारी सचिन खुडे यांचा कडक इशारा . || राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर. || राजमाता जिजाऊंच्या कार्यातून स्त्रीशक्तीची अपार ताकद दिसते : हर्षवर्धन पाटील. || साखर दरातील घसरणीमुळे साखर उद्योग संकटात : हर्षवर्धन पाटील. || इंदापूर हिंदी अध्यापक संघाचे कार्य राज्यात कौतुकास्पद : माजी आमदार दत्तात्रय सावंत. || शेळी - बोकड चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; १२ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त. || दत्त देवस्थान हेच समाजसंस्कारांचे प्रेरणास्थान : सारिकाताई भरणे. || पालखी महामार्गाच्या निकृष्ट कामांच्या चौकशीसह टोल वसुलीला स्थगिती द्या ; हर्षवर्धन पाटील यांची नितीन गडकरी यांच्याकडे मागणी. || 'निरा - भिमा' कडून दुसऱ्या पंधरवड्याचेही ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. || नगराध्यक्षपदाचे उमेदवार पठाण मोहसिन अकबर यांचा सर्वसमावेशक जाहीरनामा प्रसिद्ध ; हटके वचननाम्याने बारामतीत राजकीय चर्चांना उधाण !. || पैसा आणि लोकप्रियतेपेक्षा जीवनातील ध्येय व प्रेरणा महत्वाची : गौरी थोरात. || निरा - भिमाची वचनपूर्तीकडे वाटचाल ; १ लाख मेट्रिक टन गाळपाचा टप्पा पूर्ण. || अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून सचिन सातव नगराध्यक्षपदाचे उमेदवार ; उमेदवारीत जुने - नवे समतोल साधण्याचा प्रयत्न. || प्रभाग क्र. १९ मध्ये इच्छुकांची गर्दी तरीही लोकांची नितेश धुमाळ यांनाच पसंती. || इंदापूर तालुक्यात मुरब्बी, मातब्बरांची चाचपणी सुरू ; नवख्या उमेदवारांचा उत्साह वाढला. || 'लोन क्लोज करतो' म्हणत फसवणूक करणारा गजाआड ; बारामती शहर पोलिसांची कारवाई. || आंतरराज्य गांजा रॅकेट उघडकीस ; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त. || 'बिडा'च्या सूचनांवर त्वरित कार्यवाही करणार : चंद्रशेखर यादव. || "तू खूप मोठी चूक केलीस!" जीवे मारण्याच्या कट रचणाऱ्यांविषयी मनोज जरांगे पाटलांचा गौप्यस्फोट. || मुख्यमंत्री फडणवीसांची तात्काळ कारवाई ; पार्थ पवारांच्या कंपनीच्या जमीन व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी सुरू. || तक्रारवाडी ग्रामपंचायतीत फुलले 'कमळ' ; सरपंचपदी प्राजक्ता वाघ यांची निवड. || २o२५ च्या महाराष्ट्र उद्योग पुरस्काराने ज्योती अमोल तुपे सन्मानित. || विद्या प्रतिष्ठानमध्ये 'नशामुक्त भारत' अभियान उत्साहात. || इंदापूर पंचायत समिती आरक्षण जाहीर ; कोणता गण कोणासाठी राखीव?. || इंदापूर वकील संघटनेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा प्रवीण माने यांच्या हस्ते सत्कार. || खरी पत्रकारिता लोकशाही बळकट करते : अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार. || पक्षाने आदेश दिल्यास आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी : प्रविण माने. || निरा-भिमा कारखाना प्रतिटन १०० रुपये देणार ; शेतकऱ्यांची दिवाळी 'गोड' होणार. || करदात्यांना दिलासा ; Tax Audit Report सादर करण्याची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली. || भगरीच्या पिठामुळे आठ जणांना विषबाधा ; बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील घटना. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांची नंदन डेअरीला उद्योगभेट ; विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी अनोखा उपक्रम. || बारामतीत चारचाकीची काच फोडून तीन लाखांची रोकड लंपास. || चेक बाऊन्सप्रकरणी चार महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा ; बारामती न्यायालयाचा निकाल. || नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे हातातलं अन शेतातलं सगळं काही हरवून बसलेल्या बळीराजाला आपल्या लेखातून 'तुला जगलंच पाहिजे' म्हणत धीर देताहेत सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी. || विद्या प्रतिष्ठानच्या ‘पाटी’ला क्वालालंपूरमध्ये सुवर्णपदक. || सायबर सुरक्षेच्या जनजागृतीसाठी विद्या प्रतिष्ठानचे विद्यार्थी सरसावले. || 'जल्लोष २०२५' युवक महोत्सवात विद्या प्रतिष्ठान ठरले सर्वोत्कृष्ट. || ४ ऑक्टोबरपासून ‘सेम डे चेक क्लिअरिंग’ सेवा सुरू ; ग्राहकांना वेगवान व्यवहाराची हमी. || विद्यार्थ्यांच्या कल्पक संशोधनाला वाव ; ‘आविष्कार’ स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद. || विद्या प्रतिष्ठानच्या मुलींची कबड्डीत विजयी खेळी. || इंदापूर तालुक्यातील गावागावांत 'मोदी विकास मॅरेथॉन' राबवणार : प्रविण माने. || टेक्सटाईल पार्कमधील महिला कामगारांमध्ये सायबर सुरक्षेची जनजागृती. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षेवर जनजागृती. || महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत पुण्याचे ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा!’ ठरले सर्वोत्कृष्ट. ||

साखर दरातील घसरणीमुळे साखर उद्योग संकटात : हर्षवर्धन पाटील

दरवाढ व इथेनॉल भाव सुधारण्यासाठी सहकार मंत्री अमित शहांना शिष्टमंडळ भेटणार

देशात सुरू असलेल्या चालू ऊस गळीत हंगामाच्या सुरुवातीलाच साखरेच्या दरात मोठी घसरण झाल्याने संपूर्ण साखर उद्योग आर्थिक अडचणीत सापडला आहे. हंगामाच्या प्रारंभी साखरेचा दर प्रतिक्विंटल ३८५० रुपये होता, मात्र सध्या त्यामध्ये सुमारे ३०० रुपयांची घट झाली आहे. त्याचबरोबर गेल्या तीन वर्षांपासून इथेनॉलच्या दरात कोणतीही वाढ न झाल्याने साखर कारखान्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

साखर व इथेनॉल हे कारखान्यांचे प्रमुख उत्पन्नाचे स्रोत असून, या दोन्ही माध्यमांतून मिळणारे उत्पन्न अपुरे ठरत असल्याने कारखान्यांना शेतकऱ्यांची ऊस बिले १४ दिवसांत अदा करताना अडचणी येत आहेत. परिणामी कारखान्यांना वाढीव कर्ज घेऊन व्याजाच्या ओझ्याखाली जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. ही परिस्थिती देशातील बहुतांश साखर कारखान्यांमध्ये दिसून येत असल्याचे पाटील यांनी नमूद केले.

या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांची ऊस बिले वेळेवर देण्यासाठी साखरेचा किमान विक्री दर (MSP) प्रतिकिलो ४१ रुपये करावा, तसेच इथेनॉलच्या विक्री दरात वाढ करावी, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह आणि केंद्रीय अन्न मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भात लवकरच राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे शिष्टमंडळ केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहे.

केंद्र सरकारकडून भेटीची तारीख निश्चित झाल्यानंतर महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश यांसह प्रमुख साखर उत्पादक राज्यांतील साखर कारखानदारी क्षेत्रातील प्रतिनिधींचा सहभाग असलेले शिष्टमंडळ वस्तुस्थितीनिष्ठ व अधिकृत आकडेवारी केंद्र सरकारसमोर मांडून सविस्तर चर्चा करणार आहे.

साखर (नियंत्रण) आदेश २०२५ मधील कलम ९ नुसार साखरेच्या किमान आधारभूत किमतीत उसाची एफआरपी, रूपांतरण खर्च आणि उपउत्पादनांमधील महसूल विचारात घेणे आवश्यक आहे. सध्या उसाचा सरासरी उत्पादन खर्च (तोडणी व वाहतुकीसह) प्रतिटन ४ हजार रुपयांपेक्षा अधिक असून, साखरेची सरासरी विक्री किंमत मात्र प्रतिक्विंटल सुमारे ३६०० रुपये आहे. या तफावतीमुळे कारखान्यांवर आर्थिक ताण येत असून शेतकऱ्यांना ऊस देयके मिळण्यात विलंब होत आहे.

यापूर्वी साखरेचा किमान विक्री दर प्रतिकिलो ३१ रुपये असताना उसाची एफआरपी प्रतिटन २७५० रुपये होती. सध्या ती वाढून ३५५० रुपये झाली असून ही वाढ सुमारे २६ टक्के आहे. फेब्रुवारी ते सप्टेंबर २०२५ दरम्यान एक्स-मिल साखरेचे दर प्रतिकिलो ३८ ते ४० रुपये, तर किरकोळ दर ४६ ते ४७ रुपये होते आणि ते ग्राहकांनी विनातक्रार स्वीकारले. त्यामुळे साखरेचा किमान विक्री दर प्रतिकिलो ४१ रुपये करण्यास कोणतीही अडचण येणार नाही, असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.
तसेच, इथेनॉलच्या मागील दरवाढीनंतर उसाच्या एफआरपीमध्ये सुमारे १६ टक्के वाढ झाली असली तरी इथेनॉलच्या किमती मात्र स्थिर आहेत. त्यामुळे उसावर आधारित कच्च्या मालापासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या किमती वाढवाव्यात आणि साखर व धान्यावर आधारित इथेनॉलसाठी न्याय्य दररचना ठेवावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, केंद्र सरकारने १५ लाख मेट्रिक टन साखर निर्यातीस परवानगी दिली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर ४१० ते ४३० डॉलर प्रतिटन (एफओबी) असल्याने निर्यात फारशी परवडणारी नसली तरी जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीत चांगल्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या काळात ब्राझीलची साखर निर्यात मर्यादित असते. त्यामुळे देशातील अतिरिक्त साठा लक्षात घेता आणखी ५ लाख मेट्रिक टन साखर निर्यातीस परवानगी देऊन ती एनसीईएलमार्फत करावी, अशी मागणीही राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने केंद्र सरकारकडे करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली.


हे ही वाचा


©2026. All Rights Reserved.