ताज्या बातम्या
डॉ. क्रांती वाबळे सपकाळ यांना पीएच.डी. प्रदान; आयओटी आधारित कृषी संशोधनाला नवे परिमाण. || इथेनॉल, साखर दरवाढ व कर्ज पुनर्गठनाबाबत 10 दिवसांत निर्णय; अमित शहा यांची ग्वाही. || उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रा. डॉ. सुषमा जाधव-गुळूमकर यांचा ‘महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न’ पुरस्काराने गौरव. || युवानेते युगेंद्र पवार यांच्याकडून पिंपळीच्या मारुती मंदिराला ५० हजारांचा ध्वनीक्षेपक संच भेट. || पिंपळी-लिमटेकमध्ये महिलांसाठी मोफत आरी वर्क प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद; शरयू फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम. || १३२ कुटुंबांचे ‘हक्काच्या घराचे’ स्वप्न साकारणार ; अंकिता पाटील - ठाकरेंच्या पाठपुराव्याला मोठे यश. || पालखी महामार्गाचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करा ; युवानेते प्रविण मानेंची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी. || सोनाई परिवाराचे कार्य म्हणजे ग्रामीण अर्थकारणाचा आदर्श मॉडेल : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. || बारामती नगरपालिकेच्या नगरविकास विभागात ‘मीटर’शिवाय फाईल हालत नाही! ; नगरसेवक सुनील सस्ते यांच्याकडून नगरपालिका प्रशासनाला 'घरचा आहेर'. || मध्यस्थीमुळे वर्षभरात वाद मिटला; मुलीला साडेसतरा लाखांची पोटगी व पाच तोळे सोने. || जनता दरबाराच्या निमित्ताने अजित पवारांच्या पावलावर जय पवारांचे 'पाऊल'!. || 'शरद पार्क'च्या अध्यक्षपदी नितेश धुमाळ बिनविरोध. || बनावट पत्ते, बोगस भाडेकरारांचा असा हा खेळ ; आरटीई प्रवेशात घातला मोठा घोळ. || उजनीतून भीमा नदीत उद्यापासून पाणी सोडणार ; हर्षवर्धन पाटील यांची माहिती. || आधुनिक तंत्रज्ञानामुळे खरीप हंगाम २०२६ यशस्वी ठरणार : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे. || थोपटेवाडीच्या पाणीप्रश्नावर सभापती किरण तावरेंची 'तत्परता'. || बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण तावरे. || जागतिक महिला दिनी माळेगाव पोलीस ठाण्यात 'महिलाराज'. || गावठी हातभट्टीवर छापा टाकत साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त. || हरवलेले १८ मोबाईल शोधून मालकांना परत ; माळेगाव पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. || ईरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञान-कला-गणित प्रदर्शन ; विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण प्रकल्पांनी वेधले लक्ष. || पिंपळी ग्रामसचिवालयाला ‘लोकनेते अजितदादा पवार’ नाव देण्याची मागणी. || अन्न प्रक्रिया प्रशिक्षणातून ८५ विद्यार्थ्यांना उद्योगविश्वाची दिशा ; विद्या प्रतिष्ठानमध्ये ९ दिवसीय उपक्रम उत्साहात. || अजितदादांच्या अपघातामागे घात? ; मुंबई विमानतळावरील CCTV फुटेज नाकारले. || बारामतीत शेतकरी, महिला बचत गट, युवक व विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरता अभियान. || घरपट्टी - पाणीपट्टी करवसुलीसाठी अश्विनी बनसोडे यांचा आदर्शवत पुढाकार. || राष्ट्रवादी काँग्रेसच्या क्रियाशील सभासद नोंदणी उपक्रमात अश्विनी बनसोडेंची आघाडी. || “राणाजी, यकीन... धोखा... मौका” प्रविण मानेंचे 'हे' व्हाट्सअप स्टेटस कुणासाठी?. || वृंदावन हॉटेलसमोरील पार्किंग वादातून जीवघेणा हल्ला ; मुख्य सूत्रधार तन्मेष साळुंखे अटकेत. || चेक बाऊन्सप्रकरणी तीन महिने साध्या तुरुंगवासाच्या शिक्षेसह दुप्पट रकमेची नुकसानभरपाई देण्याचा बारामती न्यायालयाचा निकाल. || १५ दिवसांत घरकुलाचे काम सुरू करा, अन्यथा मंजुरी रद्द! ; गटविकास अधिकारी सचिन खुडे यांचा कडक इशारा . || राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर. || राजमाता जिजाऊंच्या कार्यातून स्त्रीशक्तीची अपार ताकद दिसते : हर्षवर्धन पाटील. || साखर दरातील घसरणीमुळे साखर उद्योग संकटात : हर्षवर्धन पाटील. || इंदापूर हिंदी अध्यापक संघाचे कार्य राज्यात कौतुकास्पद : माजी आमदार दत्तात्रय सावंत. || शेळी - बोकड चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; १२ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त. || दत्त देवस्थान हेच समाजसंस्कारांचे प्रेरणास्थान : सारिकाताई भरणे. || पालखी महामार्गाच्या निकृष्ट कामांच्या चौकशीसह टोल वसुलीला स्थगिती द्या ; हर्षवर्धन पाटील यांची नितीन गडकरी यांच्याकडे मागणी. || 'निरा - भिमा' कडून दुसऱ्या पंधरवड्याचेही ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. || नगराध्यक्षपदाचे उमेदवार पठाण मोहसिन अकबर यांचा सर्वसमावेशक जाहीरनामा प्रसिद्ध ; हटके वचननाम्याने बारामतीत राजकीय चर्चांना उधाण !. || पैसा आणि लोकप्रियतेपेक्षा जीवनातील ध्येय व प्रेरणा महत्वाची : गौरी थोरात. || निरा - भिमाची वचनपूर्तीकडे वाटचाल ; १ लाख मेट्रिक टन गाळपाचा टप्पा पूर्ण. || अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून सचिन सातव नगराध्यक्षपदाचे उमेदवार ; उमेदवारीत जुने - नवे समतोल साधण्याचा प्रयत्न. || प्रभाग क्र. १९ मध्ये इच्छुकांची गर्दी तरीही लोकांची नितेश धुमाळ यांनाच पसंती. || इंदापूर तालुक्यात मुरब्बी, मातब्बरांची चाचपणी सुरू ; नवख्या उमेदवारांचा उत्साह वाढला. || 'लोन क्लोज करतो' म्हणत फसवणूक करणारा गजाआड ; बारामती शहर पोलिसांची कारवाई. || आंतरराज्य गांजा रॅकेट उघडकीस ; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त. || 'बिडा'च्या सूचनांवर त्वरित कार्यवाही करणार : चंद्रशेखर यादव. || "तू खूप मोठी चूक केलीस!" जीवे मारण्याच्या कट रचणाऱ्यांविषयी मनोज जरांगे पाटलांचा गौप्यस्फोट. || मुख्यमंत्री फडणवीसांची तात्काळ कारवाई ; पार्थ पवारांच्या कंपनीच्या जमीन व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी सुरू. ||

मध्यस्थीमुळे वर्षभरात वाद मिटला; मुलीला साडेसतरा लाखांची पोटगी व पाच तोळे सोने

कोर्टाबाहेरील चर्चांमधून दोन्ही कुटुंबांची आयुष्यभराच्या कोर्टकचेरीतून सुटका ; मध्यस्थी प्रक्रियेत ॲड. सुप्रिया विशाल बर्गे व ॲड. विशाल बर्गे वकिलांनी बजावली महत्त्वाची भूमिका

वैवाहिक जीवनातील मतभेद टोकाला गेल्यानंतर न्यायालयीन लढाईपर्यंत पोहोचलेल्या एका प्रकरणाचा शेवट अखेर मध्यस्थीच्या माध्यमातून समाधानकारक पद्धतीने झाला. या प्रकरणात पत्नीला आयुष्यभराची पोटगी म्हणून साडेसतरा लाख रुपये व पाच तोळे सोने मिळाले असून, दोन्ही पक्षांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला आहे. विशेष म्हणजे, केवळ एका वर्षाच्या कालावधीत हे प्रकरण निकाली निघाल्याने दोन्ही कुटुंबांची दीर्घकालीन कोर्टकचेरी टळली.

या प्रकरणात पत्नीने पतीकडून फसवणूक झाल्याचा आरोप करत न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. तिला पोटगी तसेच तिचे दागिने परत मिळावेत, अशी भूमिका होती. त्यानुसार ॲड. सुप्रिया विशाल बर्गे यांनी संबंधित न्यायालयात पोटगीची केस दाखल केली. या प्रकरणात पतीसह त्याच्या कुटुंबातील तब्बल २३ जणांना न्यायालयात हजर राहावे लागले.

दोन्ही पक्षांच्या वकिलांनी सामाजिक जाणीव ठेवून संसार टिकविण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाबाहेर अनेक बैठका घेण्यात आल्या. मात्र, पती-पत्नी दोघेही एकत्र राहण्यास तयार नसल्याने अखेर घटस्फोटाच्या दिशेने प्रक्रिया पुढे गेली. पतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला, तर पत्नीने आयुष्यभराची पोटगी व दागिने मिळाल्यासच घटस्फोटास संमती देण्याची भूमिका घेतली.

यानंतर हे प्रकरण मध्यस्थीसाठी मे. भंडारी साहेबांकडे पाठविण्यात आले. मे. भंडारी साहेब यांनी दोन्ही पक्षांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत सलग सहा महिन्यांत आठ ते दहा बैठका घेतल्या. अनेक चर्चांनंतर अखेर दोन्ही पक्षांमध्ये समझोता झाला.

मध्यस्थी प्रक्रियेत ॲड. सुप्रिया विशाल बर्गे, ॲड. विशाल बर्गे तसेच समोरच्या पक्षाच्या वकिलांनी महत्त्वाची भूमिका बजावली. समोरच्या पक्षाच्या वकिलांनी प्रसिद्धीपासून दूर राहण्याची इच्छा व्यक्त केल्याने त्यांचे नाव जाहीर करण्यात आले नाही.

दोघांचे लग्न कुटुंबियांच्या संमतीने आणि सर्व पारंपरिक प्रक्रिया पूर्ण करून झाले होते. दोघेही सुशिक्षित व सुस्वभावी असतानाही सुरुवातीच्या काळातील मतभेद, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि परिस्थितीमुळे संसार टिकू शकला नाही. त्यातच मुलाच्या वडिलांना कॅन्सरसारखा गंभीर आजार झाल्याने पतीला कुटुंबीयांची जबाबदारी सांभाळताना पत्नीला पुरेसा वेळ देता आला नाही. दुसरीकडे, नव्याने संसारात आलेल्या पत्नीवरही अनेक जबाबदाऱ्या पडल्याने तणाव वाढत गेला.

या संदर्भात मे. भंडारी साहेब यांनी, “स्वतःच्या विचारांशी जुळणारा जोडीदार निवडावा. संसारात संयम, सहकार्य, शांतता आणि समजूतदारपणा दोघांकडेही असणे अत्यंत आवश्यक आहे,” असा सल्ला दिला.

या यशस्वी मध्यस्थीमुळे दोन्ही पक्षांना नव्याने आयुष्य सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, दीर्घकालीन न्यायालयीन संघर्ष टळल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.


हे ही वाचा


©2026. All Rights Reserved.